जंतर-मंतर पर गूंजी थाली-चम्मच की आवाज: NEET पेपर लीक के खिलाफ Cockroach Janta Party (CJP) का दिल्ली में बड़ा प्रदर्शन
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET-UG पेपर लीक प्रकरणाने आता एका मोठ्या देशव्यापी आंदोलनाचे रूप घेतले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशातील तरुण आणि विद्यार्थी आता थेट राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून २० जून २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे एक प्रचंड शांततापूर्ण आंदोलन (Peaceful Protest) पुकारण्यात आले आहे.
'चलो दिल्ली' आंदोलनाचा मुख्य उद्देश काय?सीजेपी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आणि थेट आहेत:१. पेपर लीक प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.२. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याला न्याय मिळावा.३. वारंवार होणाऱ्या पेपर लीकच्या घटनांना कायमचा लगाम लावला जावा.पिछले काही दिवसांत अनेक विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली येऊन टोकाची पावले उचलली आहेत, त्यामुळे आता थांबणे शक्य नाही, अशी संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
गांधीजींचा विचार आणि 'चलो दिल्ली' चे व्यंगचित्रप्रसिद्ध कलाकार गौरव सर्जेराव (gauravsarjeraoart) यांनी रेखाटलेले हे डिजिटल व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरत आहे. या चित्रात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी एका कॉकरोचला (तिलचट्ट्याला) काठीने पुढे चालताना दाखवले आहेत. या चित्रासोबत मगात्मा गांधीजींचे एक प्रसिद्ध वाक्य जोडले गेले आहे – "The future depends on what we do in the present" म्हणजेच "आपले भविष्य आपण वर्तमानात काय करतो यावर अवलंबून असते."हे चित्र दर्शवते की, व्यवस्थेने ज्या सामान्य तरुणांना आणि विद्यार्थ्यांना 'परजीवी' किंवा 'कॉकरोच' समजून पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला, तेच तरुण आज गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी दिल्लीकडे कूच करत आहेत. कॉकरोच हे अशा जीवाचे प्रतीक मानले गेले आहे जो कितीही कठीण परिस्थितीतही जिवंत राहतो आणि नष्ट होत नाही.सविस्तर व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील ट्रेंडया आंदोलनाची तीव्रता आणि देशभरातील तरुणांचा वाढता पाठिंबा समजून घेण्यासाठी तुम्ही खालील सोशल मीडिया रील्स आणि व्हिडिओ देखील पाहू शकता, ज्यामध्ये या आंदोलनाची संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली आहे:
इंस्टाग्रामवरील अधिकृत रील आणि माहिती पाहा: येथे क्लिक करा आणि व्हिडिओ पाहा
निष्कर्ष-- हे केवळ एक आंदोलन नसून देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि लाखो तरुणांच्या रोजगाराच्या आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी पुकारलेला एक एल्गार आहे. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही, तोपर्यंत जंतर-मंतरवरील हे अनिश्चित कालीन धरणे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment